Saturday, May 19, 2012

शाहरुख खान ने असा काय गुन्हा केला म्हणून सगळे त्याच्यावर तुटून पडलेत ...कि तो फक्त एक सेलिब्रेटी आहे म्हणून त्याच्या वर आपण तुटून पडावे ?

शाहरुख खान ने असा काय गुन्हा केला म्हणून सगळे त्याच्यावर तुटून पडलेत ...कि तो फक्त एक सेलिब्रेटी आहे म्हणून त्याच्या वर आपण तुटून पडावे ?

कि तो फक्त पैसेवाला आहे म्हणून आकसापोटी त्याचा विरुद्ध गरळ ओकावी. आणि गरळ तरी का ओकावी त्याला मोठ कोणी केलं तुम्हीच न मग भोगा ना आपल्या कर्माची फळं

या देशात व्यक्ती पूजा आणि मूर्ती पूजा दोनीही होतात आणि आपण त्यांना भजतो आणि पुजतो आणि एखादवेळेस त्या व्यक्ती कडून अशी एखादी अप्रिय घटना घडली कि आपण त्याला शिव्या द्यायला मोकळे का तर याला आपण देव मानला आहे ना . त्याच्या कडून अस कृत्य होताच कामा नये अरे बाबानो आपण एक गोष्ठ इथे विसरतो कि ती व्यक्ती पण एक मानवच आहे देव नाही ! शाहरुख ला काय शिक्षा व्हायची आहे ती होईल परंतु त्याच्या नावाने अस आकसापोटी टाहो फोडणे म्हणजे आपण आपल्या दुर्बल मानसिकतेचे दर्शन करण्यासारखे आहे. कारण त्याने व्ययक्तिक रित्या तुमचं किंवा माझं काहीही नुकसान केलेले नाही.
आता खरी कसोटी आहे ती त्याच्यावर कारवाई करणाऱ्यांची कारण कुणी त्याच्या गटातले असतील तर कुणी विरोधी आणि पुन्हा राजकारणाला सुरुवात. हे चक्र कधीही नं संपणारे आहे. या देशात सर्वात घाणेरडं काय आहे तर ती सत्ता आहे आणि तिचा चाबूक ज्याच्या हात आहे तोच खरा (हुकुमशाही)राजा आहे . आता हेच बघाना आपण म्हणतो आपल्या देशात लोकशाही आहे , विचार स्वतंत्र आहे पण तुम्ही एक गोष्ठ डोळे झाकून पाहत आहात ती म्हणजे लोकशाही मार्गाने होणारी जनतेची पिळवणूक आणि तीही महागाईच्या भासामासुराने ....याची किंमत नं कोणाला आहे नं कोणाला होईल कारण राजकारणाच्या पटलावर चीत भी मेरी और पट भी मेरी या तत्वानुसार खेळ चालतो .....सो ऑल फ्रेन्द्झ शाहरुख ला विसरा अहो तो तर एक पामर आहे त्याला का मोठ कराव ? अहो उद्या याचाच नवीन मूवी येणार असेल म्हणून हा सर्व पब्लीसिटी स्टंट कशावरून नसेल ?

भूषण पाटील


Sunday, May 13, 2012

( माझ्या आईला मी शब्दबद्ध करण्याचा केविलवाणा प्रयत्न आणि तिच्या मनात असलेली माझ्या विषयीची तळमळ...आणि मी ना....)

काही काही वेळेस आपल्या आयुष्यात अत्यंत भाऊक होण्याचे म्हणा किंवा स्वताचे अंतर्मन तपासून पाहण्याचे दिवस येतात....आणि "आई" म्हंटल कि या जगातला सर्वात जिव्हाळ्याचा आणि भाऊक " विषय" म्हणणार नाही मी त्याला पण .. ते एक अस नात असत ज्याला अंत नसतो, त्यामध्ये कोणताही दिखावा नसतो, कमीपणा नसतो.. आई या शब्दातच अमृताचा गोडवा आणि अमरत्व आहे..पण ते अमृत आणि अमरत्व आम्हाला उमगतच नाही...तिथे असणाऱ्या ओलाव्यापुढे अनंत कोटी कोटी सूर्यांची दाहकता हि शीतल चंदना सारखी आहे.....त्याचा गाभाच असा आहे कि....त्याचा थांग कुणालाही लागू शकत नाही आणि शकणारही नाही...आईच्या अंतर्मनाची व्याप्ती हि अमर्याद आहे ...तिला तोड नाही...जन्म जसा एकदाच मिळतो तशी आई हि पण एकदाच मिळते ....पण एका जन्मातून दुसरा जन्म मिळतो अस मी ऐकलं आहे .परंतु आई हि एकदाच मिळते...
म्हणून मित्रांनो माझ्या दृष्ठीने माझ्या जन्मा पेक्षाहि श्रेष्ठ हि माझी "आई" आहे .....म्हणून तुमच्या हृदयाच्या कप्प्यात तुमच्या आईसाठी एक कप्पा जरूर ठेवा आणि त्यातच तुमच-माझं सौख्य सामावलेले आहे...
कारण तिथला निवास हा साक्षात "आई स्वरूपी देवीस आपण देत असतो"
माझी आई
भूषण पाटील

माझे हरवलेले बालपण...एक कथा


या शीर्षकाची निवड मी मुद्दामच केली कारण अवती भोवती होत असलेला बदल हा मी शब्दांच्या कोंदणात पकडण्याचा प्रयत्न केला आहे...लहान मुलांची होणारी कुचंबना हि त्यांच्याच दृष्ठीने मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

आई , मम्मा , मां, मदर काय असतं हे अजून तरी मला माहित नाही कारण मी सध्या आई च्या पोटात आराम फर्मावत आहे...बाहेरून येणारा आजोबांचा आवाज, बाबांची आजीकडून होत असलेली कान उघडणी आणि तीही माझ्या साठी काय गम्मत न! मी तर अजून बाहेरच जगहि पाहिलं नाही नि आतापासूनच माझे लाड चालू झाले..आणि तो दिवस लवकरच जवळ आला..माझ्या जन्माचा ! नऊ महिने बाहेरच जग जस माझ्या स्वागताला आतुर झालं होत किंबहुना मी त्याच्या कैकपट बाहेरच जग पाहायला आतुर होतो ....माझे इवलेशे डोके, अगदी लुसलुशीत, मऊशार शरीर सतत आईच्या पोटावर आदळत होतो. तिच्या उदरातून मिळणाऱ्या उर्जेवर मी जगत होतो.
आणि आणि तो दिवस जवळ आला. माझी बाहेर येण्याची धडपड हि परमोच्च शिखर गाठू लागली. माझा श्वास हा दुपटीने आत बाहेर होऊ लागला..झालं माझ्या आईला प्रसुतीच्या वेदना जणू लागल्या .तिला भयंकर त्रास होत आहे याची मला जाणीव होत होती पण ती हे सर्व आणि सर्व फक्त माझ्यासाठी सहन करत होती. अचानक आईला जीवघेणा त्रास होऊ लागला परिस्थिती अतिशय नाजूक झाली ....तशाच अवस्थेत आईला जवळच्याच सुश्रुषा इस्पितळात हलवण्यात आलं. आईची परिथिती अतिशय बिकट होत होती प्रत्येक मिनिटागणिक . कोणालाही काय कराव हे सुचत नव्हतं..धावाधाव चालू झाली .डॉक्टर, नर्स ,वाडबोय यांची त्रेधातिरपीट उडाली. आता तर प्रत्येक सेकांदागनिक आईची ताबेत खालाऊ लागली..डॉक्टरांनी तिला इमर्जन्सी वौड मध्ये हलवलं...आणि तिथेच माझा जन्म झाला पण पण पण.....हे जग मी जिच्यामुळे पाहू शकलो ती माझी जननी, माझी माय, माझी आई हे जग सोडून निघून गेली......

( भूषण पाटील )

Friday, March 16, 2012

तेंडुलकरणे मारलेले शतक हे कितेक जणांना आनंद देऊन गेल असेल

तेंडुलकरणे मारलेले शतक हे कितेक जणांना आनंद देऊन गेल असेल यासाठी त्याच अभिनंदन आणि धन्यवाद ! पण आज त्याची प्रत्येक चौकावर आणि नाक्यावर चर्चा असेल,
आता कितेक वर्तमानपत्रे , न्यूजचानलवाले आणि आपण सर्व या विषयावर गपांचा आणि बातम्यांचा रतीब हाणून पाडू. परंतु हे करत असताना तुमच्या आणि माझ्यातले सर्वजण मात्र स्वताच अस्तित्व मात्र हरवून जातील. कारण आपलं जग हे आपलं कुटुंब आहे आणि  आपण त्यावर मात्र  बोलणार नाही, माझ्या घरात आजारी असणाऱ्या माझ्या आईला विचारणारही नाही कि  आई तुझी तबेत कशी आहे,  तुमची वाट पाहत असलेला तुमचा मुलगा तसाच झोपून गेला याच शल्य तुम्हाला वाटणार नाही, फेसबुक वर तुम्हाला न ओळखणाऱ्या तेंडुलक्र्च्या अभिनंदना ने तुम्ही तुमच्या wall भराल पण आपल्या खूप जवळच्या व्यक्तीला विश करायला दहावेळा विचार कराल. नाकोत्या गोष्ठींची सांगड घालण्यातच आपण आपलं आयुष्य वाया घालवत असतो.  आपण जर डोळे नीट उघडे ठेऊन आजूबाजूला पाहिलं तर खर सुख हे आपल्या आजूबाजूला असतं पण आपल्याला ते कधी उमगतच नाही कारण आम्ही फक्त अशा गोष्ठींच्या पाठीमागे असतो ज्या फक्त मृगजलाप्रमाणे आभास देऊन जातात ...आणि जेव्हा हा आभास होतो तेव्हा आम्ही आयुषातले अनंत अंतर कापलेले असते...आणि मग आपल्याला आयुष्याचा खरा अर्थ कळतो पण वेळ निघून गेलेली असते ...म्हणून जगताना सुखात जागा ......सुखाप्रमाणे जगू नका  कारण तो  फक्त आभास आहे आभास !

भूषण पाटील

Thursday, March 15, 2012

घडताना मी कसा घडलो

घडताना मी कसा घडलो याच भान मला नाही.आणि जेव्हा मी भानावर आलो मी घडून गेलो होतो म्हणजे याचा अर्थ असा नवे कि मी माझं भान हरपून बसलो होतो कारण मी घडत असताना माझं लक्ष्य हे आजूबाजूच्या लोकांच्या घड्ण्यावर होत आणि ते घडत असताना मी त्यांच्यातूनच त्यांच्या चांगल्या वाईट गुण दुर्गुणांचा स्वीकार करत होतो....आणि आता मी हा असा तुमच्या समोर उभा आहे.
भूषण पाटील 

जेव्हा तुमच्यावर टीका होते

जेव्हा तुमच्यावर टीका होते तेव्हा तुम्ही वेडे असता आणि जेव्हा तुमची स्तुती होते तेव्हाहि तुम्ही वेडे असता
आणि अस जर आपण राहिलो तर निंदक आणि स्तुतिपाठक मात्र नक्कीच वेडे होतात आणि हेच लक्षण आहे तुमच्या शहाणे असण्याच
भूषण पाटील 

Friday, October 7, 2011

काळ सोकाळला आहे तो केव्हा घात करेल याचा नेम नाही...

कोन्ग्रेस मध्ये असणारे डोंब कावळे म्हणे लोकशाही मार्गाने तुम्हाला जे हवे आहेत ते कायदे बनवा. म्हणजे याचा अर्थ काय वाचकहो कि तुम्ही निवडणुका लढवा आणि तुमचे उमेदवार जिंकून आणा आणि तुम्हाला हवे ते कायदे बनवा .मग या कान्ग्रेसी पिल्लावाळिला जनतेने काय चोरी, बलात्कार, भ्रष्टाचार, दादागिरी, लुटमारी करायला संसदेमध्ये पाठवलं आहे का ? का नाही येत यांना मग लोकोपयोगी कायदे करायला ? काय हरकत आहे जर अण्णांनी सा...दर केलेला जनलोकपाल बिल जसाच्या तसा मान्य करायला पण नाही तो कायदा मान्य झाला तर या उपट सुम्भांना रुचणार नाही . म्हणून लक्षात ठेवा तुमच्या मनात अशी अग्नी प्रज्वलित करा कि ती या कॉंग्रेसच्या नार्कासुराना कायमचे दहन करील आणि तुमच्या आपल्यासाठी एक जनकल्याणकारी सरकार येईल ..म्हणून कायम जागरूक राहा थोड्याशा लोभापायी आपली नितीमत्ता गहन ठेऊ नका ....कारण काळ सोकाळला आहे तो केव्हा घात करेल याचा नेम नाही...
भूषण पाटील