Saturday, May 19, 2012
मैत्रीचे धागे केव्हा विणले जातात हे कळतच नाही
Posted by
bhushan
मैत्रीचे धागे केव्हा विणले जातात हे कळतच नाही . माझ्या ऑफिस मध्ये काही दिवसांपूर्वी एक जुनिअर ग्राफिक डिझायनर आला.आमचे बंध घट्ट केव्हा जमले हे कळलंच नाही .परंतु काही कारणास्तव त्याला कंपनीतून निश्काशित करण्यात आले आणि शेवटच्या दिवशी घरी परतताना त्याचे दाटून आलेले अंतकरण मला भांबावून गेले.
असाच एक अनुभव जसा कि मित्रांचे आपल्यावर असलेले अतूट प्रेम म्हणा किंवा त्यांचे तुमच्या प्रती असलेले आदर म्हणा
मी माझ्या डेस्क वर काम करीत असताना माझा एक कलीग मित्र माझ्या बाजूला आला आणि म्हणाला कि माझे रीजाइन हे तुझ्या अगोदर झाले पाहिजे ....मला हे एकूण shock बसला मी विचारलं असं कारे तर त्याच उत्तर एकूण मला फार खेद जाणवला. तो म्हणाला कि मी गेलो तुझ्या अगोदर तर कुणाला काही फरक पडणार नाही आणि तू गेलास तर मी एक दिवसही इथे काढू शकणार नाही ....
यालाच म्हणतात मैत्रीचे अतूट बंधन जे मनाने बांधले जाते त्यामध्ये आपुलकी आणि प्रेमाचा ओलावा असतो जरुरी नाही कि ते फक्त मुलगा आणि मुलीचं नात असायला हव ...तुमच्यात एवढी ताकत असायला हवी कि तुम्ही दगडाला पाझर फोडाल....असो. मी अगोदर गेलो काय आणि तो अगोदर गेला काय ? पण जे दिवस आम्ही सोबत काढले त्यातून जे नात निर्माण झाल ते काही कमी नाही.
माझ्या अशा तमाम मित्रांना
माझा शीरसाष्टांग दंडवत
तुमचा
भूषण
असाच एक अनुभव जसा कि मित्रांचे आपल्यावर असलेले अतूट प्रेम म्हणा किंवा त्यांचे तुमच्या प्रती असलेले आदर म्हणा
मी माझ्या डेस्क वर काम करीत असताना माझा एक कलीग मित्र माझ्या बाजूला आला आणि म्हणाला कि माझे रीजाइन हे तुझ्या अगोदर झाले पाहिजे ....मला हे एकूण shock बसला मी विचारलं असं कारे तर त्याच उत्तर एकूण मला फार खेद जाणवला. तो म्हणाला कि मी गेलो तुझ्या अगोदर तर कुणाला काही फरक पडणार नाही आणि तू गेलास तर मी एक दिवसही इथे काढू शकणार नाही ....
यालाच म्हणतात मैत्रीचे अतूट बंधन जे मनाने बांधले जाते त्यामध्ये आपुलकी आणि प्रेमाचा ओलावा असतो जरुरी नाही कि ते फक्त मुलगा आणि मुलीचं नात असायला हव ...तुमच्यात एवढी ताकत असायला हवी कि तुम्ही दगडाला पाझर फोडाल....असो. मी अगोदर गेलो काय आणि तो अगोदर गेला काय ? पण जे दिवस आम्ही सोबत काढले त्यातून जे नात निर्माण झाल ते काही कमी नाही.
माझ्या अशा तमाम मित्रांना
माझा शीरसाष्टांग दंडवत
तुमचा
भूषण
जिद्दीचा महामेरू जवळ असल्याशियाव..
Posted by
bhushan
जिद्दीचा महामेरू जवळ असल्याशियाव, पर्यायाने नको असलेले किंवा अनासाये आलेले ध्येय साकरताना इच्छेला बगल देऊन नको असलेली कृती पूर्ण करताना अनिछेचा भाग विपुल असल्याने
होणारे कार्य हे केव्हाच सिद्धीस जात नाही . तसे घडल्यास आपणच आपल्या अधोगतीस कारण ठरतो आणि मग हेच माझे कर्म म्हणून स्वतास हीन लेखू लागतो...तसे न होऊ देणे जसे आम्हाच्या हातात असते बस तुमचे आमचे चित्त केंद्रित असले पाहिजे .
भूषण पाटील
होणारे कार्य हे केव्हाच सिद्धीस जात नाही . तसे घडल्यास आपणच आपल्या अधोगतीस कारण ठरतो आणि मग हेच माझे कर्म म्हणून स्वतास हीन लेखू लागतो...तसे न होऊ देणे जसे आम्हाच्या हातात असते बस तुमचे आमचे चित्त केंद्रित असले पाहिजे .
भूषण पाटील
आपल्याकडे असलेल्या साधन सामुग्रीने आपण स्वताला सधन समजतो.
Posted by
bhushan
आपल्याकडे असलेल्या साधन सामुग्रीने आपण स्वताला सधन समजतो. सधन या अर्थाने म्हणावयाचे आहे मला कि ज्यांच्या कडे जडजवाहीर, स्थावर मालमत्ता , वडिलोपार्जित धनसंपत्ती असा संचय असतो.
परंतु अशाच एखाद्या घरातील जेव्हा एखादी प्रिय व्यक्ती एखाद्या दुर्धर आजाराने ग्रस्त होते आणि कोणताही उपाय साथ देत नाही तेव्हा हे माझ्याच नशिबी का अस म्हणायची पाळी त्याच्यावर येते अर्थातच अशा वेळेस काय सधन आणि काय निर्धन सर्वांची अवस्था हि अतिशय केविलवाणी होते. परंतु अशा परिस्थितीला सामोरे जाताना त्या कुटुंबातील मंडळीनी अतिशय धर्याने सामोरे गेले पाहिजे आणि समोरच्या व्याधीग्रस्त माणसाला धीर दिला पाहिजे
तर नक्कीच त्याची माणसिक कणखरता हि त्याच्या व्याधी वर विजय मिळवून जाईल ....
परंतु अशाच एखाद्या घरातील जेव्हा एखादी प्रिय व्यक्ती एखाद्या दुर्धर आजाराने ग्रस्त होते आणि कोणताही उपाय साथ देत नाही तेव्हा हे माझ्याच नशिबी का अस म्हणायची पाळी त्याच्यावर येते अर्थातच अशा वेळेस काय सधन आणि काय निर्धन सर्वांची अवस्था हि अतिशय केविलवाणी होते. परंतु अशा परिस्थितीला सामोरे जाताना त्या कुटुंबातील मंडळीनी अतिशय धर्याने सामोरे गेले पाहिजे आणि समोरच्या व्याधीग्रस्त माणसाला धीर दिला पाहिजे
तर नक्कीच त्याची माणसिक कणखरता हि त्याच्या व्याधी वर विजय मिळवून जाईल ....
पूर्वी घरात दोन, तीन किंवा चार किंवा त्याही पेक्षा जास्त मुल असत..
Posted by
bhushan
पूर्वी घरात दोन, तीन किंवा चार किंवा त्याही पेक्षा जास्त मुल असत . काळ बदलत गेला. लाकांचे राहणीमान बदलले. घरातील टीवी जाऊन त्याची जागा संगणकाने घेतली. असो आजच हे थोडसं असलेले म्हणा किंवा नसलेले म्हणा शहाणपण लिहिण्याच कारण जरा वेगळच आहे.
मुलं मोठी होतात .मग त्यांचे संसार होतात. प्रपंचाला सुरुवात होते मग घरात पाळणा हलतो .एका नवीन आयुष्याला सुरुवात होते. मग आई वडिलांना घरातील एखादा कोपरा धरावा लागतो.त्यांच्या कडे लक्ष्य देण्यास फारसा कोणाला वेळ नसतो....पण घरातील किंवा घर सोडून गेलेल्या मुली मात्र आपल्या आई वडिलांसाठी मुलांपेक्षा जास्त जागरूक आणि संवेदनशील असतात. याच पण पण मुलींची येथे एक बाजू मांडताना मला त्यांची दुसरी बाजूही समोर आणली पाहिजे आणि ती म्हणजे जस मी वर म्हटलं कि मुली या जास्त संवेदनशील असतात आई वडिलां प्रती ..त्यांना खूप काळजी असते त्यांची परंतु त्याच मुली आपल्या सासू सासऱ्यांना नेमक त्या विरुद्ध वागणूक का देतात ? लग्न होऊनही मुली आपल्या पालकांचा सांभाळ करतात हि खूपच चांगली गोष्ठ आहे. परंतु लग्न होऊन जेव्हा त्या सासरी जातात तेव्हा तिथे मात्र घर विघटन होईल या वर भर देतात .
मुलानाही वेळ नसतो आपल्या पालकांना थोडी विचारपूस करून त्यांची हलोहावाल माहिती करून घेण्याची कारण तेव्हा तो आपल्या माता पित्यांना विसरलेला असतो. मग अशा वेळेस दूर सासरी असलेल्या मुली म्हणा किंवा इतरत्र असलेल्या मुली म्हणा आपल्या पालकांना सांभाळण्यास कशाचीही कसूर करत नाहीत. आणि त्या त्यांच्या वृद्धापकाळात काठी बनतात.
"अशा सर्व मुलीना माझा अगदी कोपरापासून कुर्निसात " Soooooo keep it up girls !
भूषण पाटील
मुलानाही वेळ नसतो आपल्या पालकांना थोडी विचारपूस करून त्यांची हलोहावाल माहिती करून घेण्याची कारण तेव्हा तो आपल्या माता पित्यांना विसरलेला असतो. मग अशा वेळेस दूर सासरी असलेल्या मुली म्हणा किंवा इतरत्र असलेल्या मुली म्हणा आपल्या पालकांना सांभाळण्यास कशाचीही कसूर करत नाहीत. आणि त्या त्यांच्या वृद्धापकाळात काठी बनतात.
"अशा सर्व मुलीना माझा अगदी कोपरापासून कुर्निसात " Soooooo keep it up girls !
भूषण पाटील
शाहरुख खान ने असा काय गुन्हा केला म्हणून सगळे त्याच्यावर तुटून पडलेत ...कि तो फक्त एक सेलिब्रेटी आहे म्हणून त्याच्या वर आपण तुटून पडावे ?
Posted by
bhushan
शाहरुख खान ने असा काय गुन्हा केला म्हणून सगळे त्याच्यावर तुटून पडलेत ...कि तो फक्त एक सेलिब्रेटी आहे म्हणून त्याच्या वर आपण तुटून पडावे ?
कि तो फक्त पैसेवाला आहे म्हणून आकसापोटी त्याचा विरुद्ध गरळ ओकावी. आणि गरळ तरी का ओकावी त्याला मोठ कोणी केलं तुम्हीच न मग भोगा ना आपल्या कर्माची फळं
या देशात व्यक्ती पूजा आणि मूर्ती पूजा दोनीही होतात आणि आपण त्यांना भजतो आणि पुजतो आणि एखादवेळेस त्या व्यक्ती कडून अशी एखादी अप्रिय घटना घडली कि आपण त्याला शिव्या द्यायला मोकळे का तर याला आपण देव मानला आहे ना . त्याच्या कडून अस कृत्य होताच कामा नये अरे बाबानो आपण एक गोष्ठ इथे विसरतो कि ती व्यक्ती पण एक मानवच आहे देव नाही ! शाहरुख ला काय शिक्षा व्हायची आहे ती होईल परंतु त्याच्या नावाने अस आकसापोटी टाहो फोडणे म्हणजे आपण आपल्या दुर्बल मानसिकतेचे दर्शन करण्यासारखे आहे. कारण त्याने व्ययक्तिक रित्या तुमचं किंवा माझं काहीही नुकसान केलेले नाही.
आता खरी कसोटी आहे ती त्याच्यावर कारवाई करणाऱ्यांची कारण कुणी त्याच्या गटातले असतील तर कुणी विरोधी आणि पुन्हा राजकारणाला सुरुवात. हे चक्र कधीही नं संपणारे आहे. या देशात सर्वात घाणेरडं काय आहे तर ती सत्ता आहे आणि तिचा चाबूक ज्याच्या हात आहे तोच खरा (हुकुमशाही)राजा आहे . आता हेच बघाना आपण म्हणतो आपल्या देशात लोकशाही आहे , विचार स्वतंत्र आहे पण तुम्ही एक गोष्ठ डोळे झाकून पाहत आहात ती म्हणजे लोकशाही मार्गाने होणारी जनतेची पिळवणूक आणि तीही महागाईच्या भासामासुराने ....याची किंमत नं कोणाला आहे नं कोणाला होईल कारण राजकारणाच्या पटलावर चीत भी मेरी और पट भी मेरी या तत्वानुसार खेळ चालतो .....सो ऑल फ्रेन्द्झ शाहरुख ला विसरा अहो तो तर एक पामर आहे त्याला का मोठ कराव ? अहो उद्या याचाच नवीन मूवी येणार असेल म्हणून हा सर्व पब्लीसिटी स्टंट कशावरून नसेल ?
भूषण पाटील
कि तो फक्त पैसेवाला आहे म्हणून आकसापोटी त्याचा विरुद्ध गरळ ओकावी. आणि गरळ तरी का ओकावी त्याला मोठ कोणी केलं तुम्हीच न मग भोगा ना आपल्या कर्माची फळं
या देशात व्यक्ती पूजा आणि मूर्ती पूजा दोनीही होतात आणि आपण त्यांना भजतो आणि पुजतो आणि एखादवेळेस त्या व्यक्ती कडून अशी एखादी अप्रिय घटना घडली कि आपण त्याला शिव्या द्यायला मोकळे का तर याला आपण देव मानला आहे ना . त्याच्या कडून अस कृत्य होताच कामा नये अरे बाबानो आपण एक गोष्ठ इथे विसरतो कि ती व्यक्ती पण एक मानवच आहे देव नाही ! शाहरुख ला काय शिक्षा व्हायची आहे ती होईल परंतु त्याच्या नावाने अस आकसापोटी टाहो फोडणे म्हणजे आपण आपल्या दुर्बल मानसिकतेचे दर्शन करण्यासारखे आहे. कारण त्याने व्ययक्तिक रित्या तुमचं किंवा माझं काहीही नुकसान केलेले नाही.
आता खरी कसोटी आहे ती त्याच्यावर कारवाई करणाऱ्यांची कारण कुणी त्याच्या गटातले असतील तर कुणी विरोधी आणि पुन्हा राजकारणाला सुरुवात. हे चक्र कधीही नं संपणारे आहे. या देशात सर्वात घाणेरडं काय आहे तर ती सत्ता आहे आणि तिचा चाबूक ज्याच्या हात आहे तोच खरा (हुकुमशाही)राजा आहे . आता हेच बघाना आपण म्हणतो आपल्या देशात लोकशाही आहे , विचार स्वतंत्र आहे पण तुम्ही एक गोष्ठ डोळे झाकून पाहत आहात ती म्हणजे लोकशाही मार्गाने होणारी जनतेची पिळवणूक आणि तीही महागाईच्या भासामासुराने ....याची किंमत नं कोणाला आहे नं कोणाला होईल कारण राजकारणाच्या पटलावर चीत भी मेरी और पट भी मेरी या तत्वानुसार खेळ चालतो .....सो ऑल फ्रेन्द्झ शाहरुख ला विसरा अहो तो तर एक पामर आहे त्याला का मोठ कराव ? अहो उद्या याचाच नवीन मूवी येणार असेल म्हणून हा सर्व पब्लीसिटी स्टंट कशावरून नसेल ?
भूषण पाटील
Sunday, May 13, 2012
( माझ्या आईला मी शब्दबद्ध करण्याचा केविलवाणा प्रयत्न आणि तिच्या मनात असलेली माझ्या विषयीची तळमळ...आणि मी ना....)
Posted by
bhushan
काही काही वेळेस आपल्या आयुष्यात अत्यंत भाऊक होण्याचे म्हणा किंवा स्वताचे अंतर्मन तपासून पाहण्याचे दिवस येतात....आणि "आई" म्हंटल कि या जगातला सर्वात जिव्हाळ्याचा आणि भाऊक " विषय" म्हणणार नाही मी त्याला पण .. ते एक अस नात असत ज्याला अंत नसतो, त्यामध्ये कोणताही दिखावा नसतो, कमीपणा नसतो.. आई या शब्दातच अमृताचा गोडवा आणि अमरत्व आहे..पण ते अमृत आणि अमरत्व आम्हाला उमगतच नाही...तिथे असणाऱ्या ओलाव्यापुढे अनंत कोटी कोटी सूर्यांची दाहकता हि शीतल चंदना सारखी आहे.....त्याचा गाभाच असा आहे कि....त्याचा थांग कुणालाही लागू शकत नाही आणि शकणारही नाही...आईच्या अंतर्मनाची व्याप्ती हि अमर्याद आहे ...तिला तोड नाही...जन्म जसा एकदाच मिळतो तशी आई हि पण एकदाच मिळते ....पण एका जन्मातून दुसरा जन्म मिळतो अस मी ऐकलं आहे .परंतु आई हि एकदाच मिळते...
म्हणून मित्रांनो माझ्या दृष्ठीने माझ्या जन्मा पेक्षाहि श्रेष्ठ हि माझी "आई" आहे .....म्हणून तुमच्या हृदयाच्या कप्प्यात तुमच्या आईसाठी एक कप्पा जरूर ठेवा आणि त्यातच तुमच-माझं सौख्य सामावलेले आहे...
कारण तिथला निवास हा साक्षात "आई स्वरूपी देवीस आपण देत असतो"
माझी आई
भूषण पाटील
म्हणून मित्रांनो माझ्या दृष्ठीने माझ्या जन्मा पेक्षाहि श्रेष्ठ हि माझी "आई" आहे .....म्हणून तुमच्या हृदयाच्या कप्प्यात तुमच्या आईसाठी एक कप्पा जरूर ठेवा आणि त्यातच तुमच-माझं सौख्य सामावलेले आहे...
कारण तिथला निवास हा साक्षात "आई स्वरूपी देवीस आपण देत असतो"
माझी आई
भूषण पाटील
माझे हरवलेले बालपण...एक कथा
Posted by
bhushan
या शीर्षकाची निवड मी मुद्दामच केली कारण अवती भोवती होत असलेला बदल हा मी शब्दांच्या कोंदणात पकडण्याचा प्रयत्न केला आहे...लहान मुलांची होणारी कुचंबना हि त्यांच्याच दृष्ठीने मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
आई , मम्मा , मां, मदर काय असतं हे अजून तरी मला माहित नाही कारण मी सध्या आई च्या पोटात आराम फर्मावत आहे...बाहेरून येणारा आजोबांचा आवाज, बाबांची आजीकडून होत असलेली कान उघडणी आणि तीही माझ्या साठी काय गम्मत न! मी तर अजून बाहेरच जगहि पाहिलं नाही नि आतापासूनच माझे लाड चालू झाले..आणि तो दिवस लवकरच जवळ आला..माझ्या जन्माचा ! नऊ महिने बाहेरच जग जस माझ्या स्वागताला आतुर झालं होत किंबहुना मी त्याच्या कैकपट बाहेरच जग पाहायला आतुर होतो ....माझे इवलेशे डोके, अगदी लुसलुशीत, मऊशार शरीर सतत आईच्या पोटावर आदळत होतो. तिच्या उदरातून मिळणाऱ्या उर्जेवर मी जगत होतो.
आणि आणि तो दिवस जवळ आला. माझी बाहेर येण्याची धडपड हि परमोच्च शिखर गाठू लागली. माझा श्वास हा दुपटीने आत बाहेर होऊ लागला..झालं माझ्या आईला प्रसुतीच्या वेदना जणू लागल्या .तिला भयंकर त्रास होत आहे याची मला जाणीव होत होती पण ती हे सर्व आणि सर्व फक्त माझ्यासाठी सहन करत होती. अचानक आईला जीवघेणा त्रास होऊ लागला परिस्थिती अतिशय नाजूक झाली ....तशाच अवस्थेत आईला जवळच्याच सुश्रुषा इस्पितळात हलवण्यात आलं. आईची परिथिती अतिशय बिकट होत होती प्रत्येक मिनिटागणिक . कोणालाही काय कराव हे सुचत नव्हतं..धावाधाव चालू झाली .डॉक्टर, नर्स ,वाडबोय यांची त्रेधातिरपीट उडाली. आता तर प्रत्येक सेकांदागनिक आईची ताबेत खालाऊ लागली..डॉक्टरांनी तिला इमर्जन्सी वौड मध्ये हलवलं...आणि तिथेच माझा जन्म झाला पण पण पण.....हे जग मी जिच्यामुळे पाहू शकलो ती माझी जननी, माझी माय, माझी आई हे जग सोडून निघून गेली......
आई , मम्मा , मां, मदर काय असतं हे अजून तरी मला माहित नाही कारण मी सध्या आई च्या पोटात आराम फर्मावत आहे...बाहेरून येणारा आजोबांचा आवाज, बाबांची आजीकडून होत असलेली कान उघडणी आणि तीही माझ्या साठी काय गम्मत न! मी तर अजून बाहेरच जगहि पाहिलं नाही नि आतापासूनच माझे लाड चालू झाले..आणि तो दिवस लवकरच जवळ आला..माझ्या जन्माचा ! नऊ महिने बाहेरच जग जस माझ्या स्वागताला आतुर झालं होत किंबहुना मी त्याच्या कैकपट बाहेरच जग पाहायला आतुर होतो ....माझे इवलेशे डोके, अगदी लुसलुशीत, मऊशार शरीर सतत आईच्या पोटावर आदळत होतो. तिच्या उदरातून मिळणाऱ्या उर्जेवर मी जगत होतो.
आणि आणि तो दिवस जवळ आला. माझी बाहेर येण्याची धडपड हि परमोच्च शिखर गाठू लागली. माझा श्वास हा दुपटीने आत बाहेर होऊ लागला..झालं माझ्या आईला प्रसुतीच्या वेदना जणू लागल्या .तिला भयंकर त्रास होत आहे याची मला जाणीव होत होती पण ती हे सर्व आणि सर्व फक्त माझ्यासाठी सहन करत होती. अचानक आईला जीवघेणा त्रास होऊ लागला परिस्थिती अतिशय नाजूक झाली ....तशाच अवस्थेत आईला जवळच्याच सुश्रुषा इस्पितळात हलवण्यात आलं. आईची परिथिती अतिशय बिकट होत होती प्रत्येक मिनिटागणिक . कोणालाही काय कराव हे सुचत नव्हतं..धावाधाव चालू झाली .डॉक्टर, नर्स ,वाडबोय यांची त्रेधातिरपीट उडाली. आता तर प्रत्येक सेकांदागनिक आईची ताबेत खालाऊ लागली..डॉक्टरांनी तिला इमर्जन्सी वौड मध्ये हलवलं...आणि तिथेच माझा जन्म झाला पण पण पण.....हे जग मी जिच्यामुळे पाहू शकलो ती माझी जननी, माझी माय, माझी आई हे जग सोडून निघून गेली......
( भूषण पाटील )
Friday, March 16, 2012
तेंडुलकरणे मारलेले शतक हे कितेक जणांना आनंद देऊन गेल असेल
Posted by
bhushan
तेंडुलकरणे मारलेले शतक हे कितेक जणांना आनंद देऊन गेल असेल यासाठी त्याच अभिनंदन आणि धन्यवाद ! पण आज त्याची प्रत्येक चौकावर आणि नाक्यावर चर्चा असेल,
आता कितेक वर्तमानपत्रे , न्यूजचानलवाले आणि आपण सर्व या विषयावर गपांचा आणि बातम्यांचा रतीब हाणून पाडू. परंतु हे करत असताना तुमच्या आणि माझ्यातले सर्वजण मात्र स्वताच अस्तित्व मात्र हरवून जातील. कारण आपलं जग हे आपलं कुटुंब आहे आणि आपण त्यावर मात्र बोलणार नाही, माझ्या घरात आजारी असणाऱ्या माझ्या आईला विचारणारही नाही कि आई तुझी तबेत कशी आहे, तुमची वाट पाहत असलेला तुमचा मुलगा तसाच झोपून गेला याच शल्य तुम्हाला वाटणार नाही, फेसबुक वर तुम्हाला न ओळखणाऱ्या तेंडुलक्र्च्या अभिनंदना ने तुम्ही तुमच्या wall भराल पण आपल्या खूप जवळच्या व्यक्तीला विश करायला दहावेळा विचार कराल. नाकोत्या गोष्ठींची सांगड घालण्यातच आपण आपलं आयुष्य वाया घालवत असतो. आपण जर डोळे नीट उघडे ठेऊन आजूबाजूला पाहिलं तर खर सुख हे आपल्या आजूबाजूला असतं पण आपल्याला ते कधी उमगतच नाही कारण आम्ही फक्त अशा गोष्ठींच्या पाठीमागे असतो ज्या फक्त मृगजलाप्रमाणे आभास देऊन जातात ...आणि जेव्हा हा आभास होतो तेव्हा आम्ही आयुषातले अनंत अंतर कापलेले असते...आणि मग आपल्याला आयुष्याचा खरा अर्थ कळतो पण वेळ निघून गेलेली असते ...म्हणून जगताना सुखात जागा ......सुखाप्रमाणे जगू नका कारण तो फक्त आभास आहे आभास !
भूषण पाटील
आता कितेक वर्तमानपत्रे , न्यूजचानलवाले आणि आपण सर्व या विषयावर गपांचा आणि बातम्यांचा रतीब हाणून पाडू. परंतु हे करत असताना तुमच्या आणि माझ्यातले सर्वजण मात्र स्वताच अस्तित्व मात्र हरवून जातील. कारण आपलं जग हे आपलं कुटुंब आहे आणि आपण त्यावर मात्र बोलणार नाही, माझ्या घरात आजारी असणाऱ्या माझ्या आईला विचारणारही नाही कि आई तुझी तबेत कशी आहे, तुमची वाट पाहत असलेला तुमचा मुलगा तसाच झोपून गेला याच शल्य तुम्हाला वाटणार नाही, फेसबुक वर तुम्हाला न ओळखणाऱ्या तेंडुलक्र्च्या अभिनंदना ने तुम्ही तुमच्या wall भराल पण आपल्या खूप जवळच्या व्यक्तीला विश करायला दहावेळा विचार कराल. नाकोत्या गोष्ठींची सांगड घालण्यातच आपण आपलं आयुष्य वाया घालवत असतो. आपण जर डोळे नीट उघडे ठेऊन आजूबाजूला पाहिलं तर खर सुख हे आपल्या आजूबाजूला असतं पण आपल्याला ते कधी उमगतच नाही कारण आम्ही फक्त अशा गोष्ठींच्या पाठीमागे असतो ज्या फक्त मृगजलाप्रमाणे आभास देऊन जातात ...आणि जेव्हा हा आभास होतो तेव्हा आम्ही आयुषातले अनंत अंतर कापलेले असते...आणि मग आपल्याला आयुष्याचा खरा अर्थ कळतो पण वेळ निघून गेलेली असते ...म्हणून जगताना सुखात जागा ......सुखाप्रमाणे जगू नका कारण तो फक्त आभास आहे आभास !
भूषण पाटील
Thursday, March 15, 2012
घडताना मी कसा घडलो
Posted by
bhushan
घडताना मी कसा घडलो याच भान मला नाही.आणि जेव्हा मी भानावर आलो मी घडून गेलो होतो म्हणजे याचा अर्थ असा नवे कि मी माझं भान हरपून बसलो होतो कारण मी घडत असताना माझं लक्ष्य हे आजूबाजूच्या लोकांच्या घड्ण्यावर होत आणि ते घडत असताना मी त्यांच्यातूनच त्यांच्या चांगल्या वाईट गुण दुर्गुणांचा स्वीकार करत होतो....आणि आता मी हा असा तुमच्या समोर उभा आहे.
भूषण पाटील
जेव्हा तुमच्यावर टीका होते
Posted by
bhushan
जेव्हा तुमच्यावर टीका होते तेव्हा तुम्ही वेडे असता आणि जेव्हा तुमची स्तुती होते तेव्हाहि तुम्ही वेडे असता
आणि अस जर आपण राहिलो तर निंदक आणि स्तुतिपाठक मात्र नक्कीच वेडे होतात आणि हेच लक्षण आहे तुमच्या शहाणे असण्याच
भूषण पाटील
Friday, October 7, 2011
काळ सोकाळला आहे तो केव्हा घात करेल याचा नेम नाही...
Posted by
bhushan
कोन्ग्रेस मध्ये असणारे डोंब कावळे म्हणे लोकशाही मार्गाने तुम्हाला जे हवे आहेत ते कायदे बनवा. म्हणजे याचा अर्थ काय वाचकहो कि तुम्ही निवडणुका लढवा आणि तुमचे उमेदवार जिंकून आणा आणि तुम्हाला हवे ते कायदे बनवा .मग या कान्ग्रेसी पिल्लावाळिला जनतेने काय चोरी, बलात्कार, भ्रष्टाचार, दादागिरी, लुटमारी करायला संसदेमध्ये पाठवलं आहे का ? का नाही येत यांना मग लोकोपयोगी कायदे करायला ? काय हरकत आहे जर अण्णांनी सा...दर केलेला जनलोकपाल बिल जसाच्या तसा मान्य करायला पण नाही तो कायदा मान्य झाला तर या उपट सुम्भांना रुचणार नाही . म्हणून लक्षात ठेवा तुमच्या मनात अशी अग्नी प्रज्वलित करा कि ती या कॉंग्रेसच्या नार्कासुराना कायमचे दहन करील आणि तुमच्या आपल्यासाठी एक जनकल्याणकारी सरकार येईल ..म्हणून कायम जागरूक राहा थोड्याशा लोभापायी आपली नितीमत्ता गहन ठेऊ नका ....कारण काळ सोकाळला आहे तो केव्हा घात करेल याचा नेम नाही...
भूषण पाटील
Wednesday, October 5, 2011
यांचं फक्त राजकारण आणि जनसामान्यांच मरण.!
Posted by
bhushan
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या स्थानिक पक्षा मध्ये होणाऱ्या चढाओढीमध्ये सामान्य रिक्षावाल्याच मरण. यांचं फक्त राजकारण आणि जनसामान्यांच मरण. एवढंच जर पुळका येतो सामन्या जनतेचा मग तेव्हा कुठे हे पक्ष जेव्हा निवासी डॉक्टरांनी बेमुदत संप पुकारला होता , त्यामध्ये असे किती तरी सामान्य जन होते जे उपचारा अभावी तळमळत होते, वेदनांनी व्याकूळ झाले होते आणि कितेकानी तर प्राणही सोडले असतील तेव्हा नाही दाखवला यांनी कोणता सामान्य जनतेसाठी पुळका , नाहक निवडणुका आल्या जवळ कि लोकांच बिनपैशाच मनोरंजन करायचं एवढंच यांना ठाऊक .का नाही अण्णांच्या आंदोलना वेळी हे पक्ष रस्त्यावर उतरले तेव्हा काय जनतेच्या विषयाशी निगडीत प्रश्न नव्हता का ? पण नाही तिथे नाही जमणार यांना ते करायला . जे कुणी कुठल्याही पक्षात कार्यकर्ते ( जे कुठल्याही पदावर नाहीत. ) म्हणून कार्यरत असतात तीही सामान्य जनताच आहे...पण कुठल्यातरी पक्षाशी समंध असावेत म्हणून ते कार्यरत असतात आणि स्वताला कार्यकर्ते म्हणून संबोधतात !...
रिक्षावाले असतील परप्रांतीय किंवा आणखीन कुठले परंतु खरच जेव्हा जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न उठतात तेव्हा हे पक्ष मुग गिळून गप्पा का बसतात ?
याचं उत्तर तर कुणीही देऊ शकत नाही कारण प्रत्येकालाच राजकारणाच्या पटलावर आपली पोळी शेकून घ्यायची आहे ...सामान्य जनतेचा कुणीही मालक नाही..सर्व आहेत ते ....स्वार्थासाठी !
भूषण पाटील
रिक्षावाले असतील परप्रांतीय किंवा आणखीन कुठले परंतु खरच जेव्हा जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न उठतात तेव्हा हे पक्ष मुग गिळून गप्पा का बसतात ?
याचं उत्तर तर कुणीही देऊ शकत नाही कारण प्रत्येकालाच राजकारणाच्या पटलावर आपली पोळी शेकून घ्यायची आहे ...सामान्य जनतेचा कुणीही मालक नाही..सर्व आहेत ते ....स्वार्थासाठी !
भूषण पाटील
Monday, October 3, 2011
MorNiiNg MornIng GooD GoOd MorNinG !
Posted by
bhushan
MorNiiNg MornIng GooD GoOd MorNinG ! LetS gO BuddY On thE hIlL...sEE sUN sHInE, N HavE FuN On GoInG In yoUr Own TyminG !
BhUsHan PaTiL
NeVeR SaY Good ByE !
Posted by
bhushan
NeVeR SaY Good ByE !
Say OnLy ! ByE ! SweEt DrEaMs, TaKe CarE, GooD NiGhT
HopE So MorNinG wIlL Be BriNg NeW DireCtiON YoUr LifE
Say OnLy ! ByE ! SweEt DrEaMs, TaKe CarE, GooD NiGhT
HopE So MorNinG wIlL Be BriNg NeW DireCtiON YoUr LifE
Bhushan Patil
Sunday, October 2, 2011
गांधी या नावाला आणखीन जास्त प्रठीष्ठा प्राप्त झाली आहे
Posted by
bhushan
आज गांधी जयंती .......पण खऱ्या अर्थाने पाहिलं तर भारत या खंडा मध्ये गांधी म्हणजे कॉंग्रेस या भ्रष्टाचारी पक्षाने ( सर्वच पक्ष भ्रष्ट आहेत ) त्यांचे नाव घेऊन राजकारण केलं आहे. आणि या देशात गांधीना मानणारा जसा एक गट आहे तसाच एक गट त्यांना विरोध करणारा हि आहे, अर्थातच सार्वजनिक मंचावरून तो विरोध न होता ग्रुप डिस्कशन मध्ये होतो हे कुणीही नाकारू शकत नाही . पण आज अण्णा हजारे मुळे मला अस वाटत कि गांधी या नावाला आणखीन जास्त प्रठीष्ठा प्राप्त झाली आहे ...कारण आजच्या पिढीवर किंवा जनमानसावर अण्णांचा जो प्रभाव आहे...त्या प्रभावाने गांधीना आणखीन मोठे केलं आहे. कारण अण्णांनी अण्णांनी अनेकदा आपल्या मंचावरून गांधींच्या विचारसरणीचा उदो उदो केला आहे त्यामुळे नकळतच गांधीनाही हे मोठेपण आपसूकच मिळून गेले आहे ....म्हणजे आज गांधीना विरोधी असणारेही किंचित का असेना गांधींच्या विरोधात बोलताना कचरतात कारण त्यांना अस वाटत कि आपण अण्णांनाच विरोध करत आहोत आणि हि भावना फार प्रखर्षाने जनमानसात रुजत आहे ....
म्हणूनच कुणीही कितीही टाहो फोडला तरी अण्णांमुळे गांधीजी हे नक्कीच मोठे झाले..अर्थात जे गांधीना विरोध करत होते त्यांच्या मनात ...
हो कि नाही ???
तुम्हाला काय वाटत ??
भूषण पाटील
Friday, September 30, 2011
सचिन तेंडुलकरला देण्यात येणार भारतरत्न अवार्ड आता लॉबीच्या भोवऱ्यात
Posted by
bhushan
सचिन तेंडूलकर, इंदुल्कर किंवा आणखी काही , तसेच अमिताभ बच्चन ( उर्फ बिग बी ) यांना भारतरत्न मिळावा म्हणून सध्या जंग जंग पछाडली जात आहे.
वरील सर्व महाशयांच अस काय योगदान आहे म्हणून यांना भारतरत्न द्यावा .१००च काय किंवा १००० सेन्चुरी मारल्या काय ? हा निकष आहे अवार्ड देण्याचा ? कि अमिताभ ने किती चांगलं काम करून लोकांच मनोरंजन केलं ? अर्थातच करोडो रुपये घेऊन ....अशा लोकांना भारतरत्न द्यावा काय ?
कि वैज्ञानिक , सामाजिक आणि वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात भरघोस योगदान देऊन आपल्या देशाची मान नवे तर स्वतःच ज्ञान अखंड पाझरून त्यातून निर्माण होणाऱ्या शोध सदृश्य योशोगाथेला भारतरत्न दिला पाहिजे कि नवे इंदुल्कर , बच्चे बुच्चन यांना दिला जावा ....पण या देशाच हे दुर्दव्य आहे कि येथील विचारधारा विकास , आरोग्य , विज्ञान , ज्ञान , समाज सेवा , परोपकार यांना न जुमानता ती एका प्रसिद्धीच्या मागे जाते म्हणूनच आज फक्त तेंडूलकर, अमिताभ किंवा एखादा मयत किंवा जिवंत राजकारणी याच्या पलीकडे कोणालाही नाव दिसत नाही ....परंतु या देशात अशी कितीतरी नाव आहेत जी या भारतरात्नापेक्षा
श्रेष्ठ आहेत ....
भूषण पाटील
वरील सर्व महाशयांच अस काय योगदान आहे म्हणून यांना भारतरत्न द्यावा .१००च काय किंवा १००० सेन्चुरी मारल्या काय ? हा निकष आहे अवार्ड देण्याचा ? कि अमिताभ ने किती चांगलं काम करून लोकांच मनोरंजन केलं ? अर्थातच करोडो रुपये घेऊन ....अशा लोकांना भारतरत्न द्यावा काय ?
कि वैज्ञानिक , सामाजिक आणि वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात भरघोस योगदान देऊन आपल्या देशाची मान नवे तर स्वतःच ज्ञान अखंड पाझरून त्यातून निर्माण होणाऱ्या शोध सदृश्य योशोगाथेला भारतरत्न दिला पाहिजे कि नवे इंदुल्कर , बच्चे बुच्चन यांना दिला जावा ....पण या देशाच हे दुर्दव्य आहे कि येथील विचारधारा विकास , आरोग्य , विज्ञान , ज्ञान , समाज सेवा , परोपकार यांना न जुमानता ती एका प्रसिद्धीच्या मागे जाते म्हणूनच आज फक्त तेंडूलकर, अमिताभ किंवा एखादा मयत किंवा जिवंत राजकारणी याच्या पलीकडे कोणालाही नाव दिसत नाही ....परंतु या देशात अशी कितीतरी नाव आहेत जी या भारतरात्नापेक्षा
श्रेष्ठ आहेत ....
भूषण पाटील
Saturday, September 17, 2011
One day picnic spots in & around Mumbai & Thane with travel arrangements
Posted by
bhushan
Location | No of Kms / hrs from Mumbai | Hotel Name | Packages |
| Alibaug | 120 kms / 3 hours | Hotel Big Splash | Click Here |
| Hotel Sahyadri | Click Here | ||
| Dahanu | 120 kms / 3.5 hrs | Hotel Beachside | Click Here |
| Igatpuri | 120 kms / 3 hours | Manas Resorts | Click Here |
| Karjat | 85 kms / 2.5 hours | Satya Health Farm | Click Here |
| Prakruti farms | Click Here | ||
| Piccadilly Country Club & Resort | Click Here | ||
| Karnala | 50 kms / 1 hour | Rishi Resorts | Click Here |
| Lonavala | 100 kms / 2 hours | Cosmos Resorts (water park) | Click Here |
| Kumar Resorts (water park) | Click Here | ||
| Sky Blue Resort | Click Here | ||
| Hotel La Revival | Click Here | ||
| Sweet Heart Resort | Click Here | ||
| Nagothane | 100 kms / 2.5 hours | Kamath Residency | Click Here |
| Nature Trails | 100 kms / 3 hours | Sajan Nature Club | Click Here |
| 100 kms / 3 hours | Garden Resort Vikramgad | Click Here | |
| 90 kms / 2 hours | Durshet Forest Lodge (Khopoli) | Click Here | |
| Panvel | 40 kms / 1 hour | Raigad Resorts | Click Here |
| Panvel | 40 kms / 1 hour | Zus Family Resort | Click Here |
| Thane District | 100 kms / 3 hours | Harshgiri Lake Resort (Shahapur) & Water park | Click Here |
| 100 kms / 3 hours | Green paradise (Arnala beach Virar) | Click Here | |
| 125 kms / 3 hours | Silient Resort (Palghar Manor) | Click Here | |
| 100 kms / 3 hours | Great Escape (Virar) | Click Here | |
| 100 kms / 3 hours | Srushti Farms (Vashind) Agro Tourism | Click Here | |
| 3 kms from Mumbai-Nasik highway | Dirghayu Farms Agri Resort Tal. Shahapur, Dist. Thane |
Subscribe to:
Posts (Atom)


